शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कोरेगाव-भीमा दंगलीत मराठा संघटना : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:59 IST

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देदंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव ते पेरणे फाट्यादरम्यान अज्ञातांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चाळीसवर वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. दगडफेकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. या दंगलीतून मराठा आणि दलित समाजातील दरी वाढवून आपली पोळी भाजून घेण्याचा काही संघटनांचा हेतू होता. परिस्थिती लक्षात घेतल्यास या दंगलीमागे काही मराठा समाजातील संघटनांचाच हात होता, असे दिसत आहे. हे जरी खरे असले तरी, दंगलीनंतर दि. २ आणि ३ जानेवारीला मराठा आणि दलित समाजातील वाद संपविण्यासाठीही मराठा समाजातील काही सामाजिक काम करणाºया पदाधिकारी आणि पोलिसांनीच मध्यस्थी केली. यामुळे दोन्ही समाजातील वाद निवळला आहे.महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठा-दलित वाद परवडणार नसल्यामुळे दोन्ही समाजांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहिले पाहिजे. दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.3प्रकाश आंबेडकर तमाशातील राजाकोरेगाव-भीमा दंगलीमध्ये दलित समाजावर अन्याय झाला. या संतापातूनच समाज रस्त्यावर उतरला होता. मी मंत्री असल्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकत नव्हतो. याचा गैरफायदा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी लगेच बंदची हाक दिली. राज्यभरातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. प्रकाश आंबेडकर तमाशातील राजा झाल्याप्रमाणे वागत होते. एका दिवसात राजा होत नाही. समाजाने केलेल्या आंदोलनाचे श्रेय घेणे चुकीचे आहे. या आंदोलनात बहुतांशी माझेच कार्यकर्ते होते, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.उध्दव ठाकरे यांची नाराजी नरेंद्र मोदी, अमित शहापर्यंत पोहोचविलीकेंद्र आणि राज्यात २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती कायम राहणार आहे. मित्रपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सत्ता टिकविता येत नाही. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची गरज असतानाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ही नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. ते महिन्याभरात ठाकरे यांची नाराजी दूर करून भविष्यात भाजपबरोबर युती ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. माझा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आठवले यांनी संगितले.नीरव मोदीच्या मुसक्या आवळणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळेबहाद्दर उद्योगपती नीरव मोदी याचा काहीएक संबंध नाही. नीरव मोदीच्या मुसक्या आवळून आम्ही बँकेतील घोटाळ्यामधील सर्व पैसे वसूल करणार आहे. भ्रष्टाचारी मंडळींना आमचे सरकार कधीच पाठीशी घालत नाही. बँकांनीही बड्या कर्जदारांना कर्जपुरवठा करताना काही आचारसंहिता घालून घेतल्या पाहिजेत. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. बड्यांना बँका लगेच कर्ज देतात आणि छोट्यांना कर्जपुरवठा करीत नसल्याबद्दलही रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.